Powered By Blogger

10 April, 2011

अण्णांच्या उपोषनावरील टीका

अण्णांनी उपोषण सोडले पण हे हितसंबंधांचे राजकारण आहे अशी जी टीका होत आहे हि अत्यंत चुकीची आहे असे वाटते.एक तर १२१ कोटींच्या या देशात हा एकच हिरा निघाला ज्याने लोकपाल विधेयक या अतिशय ज्वलंत विषयावर हिमतीने आमरण उपोषण करून त्याची यशस्वी सांगता केली .
अहो टीका करायला काय लागते ? मिडीया ला तर आज खाद्यच हवे .( माफ करा हं मिडीयावाले ) .मी तर असे म्हणेन कि जसे अश्या प्रकारची टीका करणारे अनेक जन आज पुढे येत आहेत अगदी अश्याच प्रकारे अण्णा हजारे सारखे हजारो अण्णा जर तयार झाले तर हा भारत देश जगभरात महासत्ता म्हणून नक्कीच ओळखला जाईल.अण्णांची प्रेरणा घेऊन खरोखरच तरुण वर्गाने पुढाकार घेतला तर " सारे जहान से अच्छा हिंदोस्तान हमारा " हे गीत नक्कीच खरया अर्थाने सार्थठरेल.

No comments: