Powered By Blogger

09 August, 2014

अनपेक्षितपणे मिळालेले खासदारपद आणि समाजसेवेची जाणीव !

भारतरत्न " सचिन रमेश तेंडूलकर आणि सिनेक्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व रेखा या दोघानाही तत्कालीन सरकारने खासदारपद देवून त्यांच्या कारकीर्दीचा गौरव केला. इथपर्यंत ठीक आहे कि देशासाठी त्यांनी बाजी पणाला लावून आपापल्या क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केली म्हणून त्यांचा बहुमान सरकारने केला.
सचिनने क्रिकेट पासून सन्यास घेतला त्यामुळे असे वाटले कि खासदारपद मिळाल्यानंतर  त्यांच्याकडून समाजाला खूप चांगली सेवा मिळेल आणि संसदेत उपस्थित होणार्या अनेक प्रश्नांवर होणार्या चर्चेत सहभागी होवून ते आपले मौलिक विचार मांडून अनेक समाजोपयोगी योजना राबवतील तसेच विशेषत: क्रीडा क्षेत्रात असलेल्या अनेक त्रुटी आणि कमतरता यांचा देखील त्यांच्याकडून योग्य असा पाठपुरावा होईल पण हा आपला म्हणजेच सर्व समाजाचा भ्रम ठरला कारण त्यांनी लोकसभेत हजेरीच लावली नाही तर कामकाज काय करणार ? हीच गोष्ट रेखाच्या बाबतीत सुद्धा ! लोकसभेतील एकूण कामकाजाच्या तासांपैकी ठराविक तासांची उपस्थिती सक्तीची असावयास हवी आणि कदाचित असेलही पण हे लोक celebrity असल्यामुळे त्यांच्यासाठी माफ असेल. " भारतरत्न "हे सर्वोच्चपद बहाल केल्यानंतर लोकसभेचे सदस्यपद देण्याची काहीच गरज नव्हती .
प्रकाश आमटे,अन्ना हजारे,यांच्यासारखे नि:स्वार्थी भावनेतून आणि कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंध नसलेले अनेक समाजसेवक खासदार पदासाठी योग्य राहिले असते पण सत्तेपुढे शहाणपण …… चालत नसते हेच खरे !
अजूनही वेळ गेलेली नाही या दोघांचेही लोकसभा सदस्यपद काढून घेण्यात यावे आणि जनमत विचारात घेवून या दोन जागा भरण्यात याव्यात असे वाटते .
                                          महादेव विश्वनाथ कापुसकरी
                                          बसमत नगर जि. हिंगोली .

No comments: