Powered By Blogger

24 August, 2014

गेल्या अनेक दिवसांपासून अजिबात पाऊस पडलेला नसल्यामुळे शेतातील पिके कोमेजू लागली आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे . पोळा सन एरवी अतिशय उत्साहात साजरा केला जातो परंतु या वेळेस आपल्या भागातील पोळा निरुत्साहात साजरा होईल असे चित्र दिसते. दोन वेळेस पेरणी करूनही पिक हाती लागते कि नाही अशी परिस्थिती आहे.
एकीकडे हे दृश्य असतानाच वर्तमानपत्रात बातमी वाचली सलमान खान चा नुकताच प्रकाशित झालेला सिनेमा " किक " ने अल्पावधीत ३७५ कोटी रुपयांचा business केला .  आणि हे celebrate करण्यासाठी kick आणण्यासाठी सिनेजगतात पार्ट्या झोडल्या जात आहेत. किती मोठी विसंगती आणि किती मोठी आर्थिक विषमतेची दरी आहे आपल्या समाजात ?
वाटले होते कि या वर्षीही आपले येलदरी धारण भरेल आणि येणारी २ वर्षे शेतकरी ओलिताखालील पिके घेवून आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल पण कसले काय ?
आपला शेतकरी शेवटी कर्जातच जगतो,कर्जातच मरतो हेच विदारक सत्य आपण अनुभवतो .

1 comment:

Vijay Shendge said...

शेतकऱ्याची चिंता आहे कुणाला ?