Powered By Blogger

21 May, 2012

सत्यमेव जयते !

अमीर खान यांनी सुरु केलेले सत्यमेव जयते हे सिरीयल पाहिल्यानंतर ज्याला मन आहें त्याचे डोळे पानावल्याखेरीज राहू शकत नाहीत .आजपर्यंत जे तीन एपिसोड चे विषय त्यांनी निवडले आहेत ते तीनही विषय अतिशय ज्वलंत आणि सामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत .टायटल साँग पासून ते बैठकीची ठेवण ,रंगसंगती ,बोलण्याची विशेष ढब,आणि नेमके थीम दाखविण्याची पद्धत इ.सर्व गोष्टी फारच समर्थपणे आणि परिणामकारक रीत्या पेलल्या आहेत ज्याची तारीफ केली तेवढी कमी आहें.
ह्या सिरीयल सारखे यश अशा प्रकारच्या कोणत्याही सिरीयलला इतक्या अल्पावधीत कधी मिळाले नाही.
जिकडे तिकडे फेसबुक वर,वर्तमान पत्रान्मद्धे ,नियत कालीकान्मद्धे सर्व ठिकाणी चर्चा सत्यमेव जयते चीच.
आणि या विषयांवर एवढे सारे पाहिल्यानंतर समाजात जे काही चांगले  घटक आहेत की ज्यांनी थोडेसे कष्ट घेतले तर हे सारे चित्र बदलू शकते.आणि २०-२५ % जरी बदल झाला आणि काही लोकांचे मतपरिवर्तन होवून वाईट प्रथाणा जर फाटा मिळाला तर फार मोठे यश या कार्यक्रमाला मिळाले असे सिद्ध होईल.हा कार्यक्रम तयार करण्यासाठी  फार मोठे परिश्रम घेतलेले दिसत आहेत.आज ज्यांचेकडे लग्नाची मुले किंवा मुली आहेत त्यांनी तर हा कार्यक्रम पाहणे फार गरजेचे आहें.विशेषता: मुलींच्या पालकांनी जर असे हुन्ड्याचे मागणीचे प्रकार किंवा मुलीला त्रास देण्याचे प्रकार होत असतील तर या गोष्टी कश्या प्रकारे हाताळायच्या यातून शिकता येईल.
अमीर खान आणि Reliance foundation यांचे श्रेय फार मोठे आहें यात कोणताही वादच नाही.
भारत देश हा क्रशिप्रधान आहें आणि देशातील जवळपास सत्तर टक्के लोकसंख्या या व्यवसायावर अवलंबून आहेत.मात्र त्यांच्या व्यथा या सिरीयल वाल्यांनी परिणामकारक पद्धतीने जर जगापुढे मांडला तर फार बरे होईल.
शेतकर्यांचे शोषण समाजातील सर्व घटकाकडून ,शासनाकडून कसे होते याचे जिवंत चित्रण होणे आवश्यक आहें.
पुढे मागे या सिरीयल ने हा विषय घेतला तर या शोशिताना थोडा दिलासा मिळेल.

No comments: