Powered By Blogger

05 August, 2009

आता बस्स.......झाले तेवढे पुरे झाले......


आज सर्वत्र सहावा वेतन आयोग लागु झालेला आहे.मुख्य सचिवापासुन तेतलागालातल्या कनिष्ठाताल्या कनिष्ठ कर्मचार्यापर्यंत सर्वानाच जवलपास २५% ते ३०% वेतान्वाध मिलालेली आहे.जगातील एक मोठी लोकशाही असलेला देश म्हणुन भारताकडेपाहिले जाते.अशा भारतातील एक अग्रगण्य पुढारलेले राज्य म्हणुन महाराष्ट्रासनावारुपास आनावयाचे असेल तर माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सल्लागार( प्रामाणिक )
यानी महाराष्ट्रातील भ्रष्टाचार शुन्य पातलिवर आनान्यासाठी यशस्वी उपाय योजना करणे ती अमलात आनने
ही कालाची गरज आहे।
माननीय मुख्यमंत्री साहेबानी विभागीय पातलिवर जसे मुंबई,पुणे,नागपुर,औरंगाबाद येथे सर्व वरिष्ठ अधिकारी
( त्या त्या खात्यातील ) यांचे विभागीय चिंतन शिबिरे आयोजित करुन त्या त्या खात्याच्या प्रमुखाना सम्बंधित
खात्याच्या भ्रष्टाचारास सर्वस्वी जबाबदार धरून कार्यवाही करणे अगत्याचे आहे।
आज आपण पाहतो महसूल खात्यात आयुक्त,जिल्हाधिकारी,तहसीलदार,पेशकार,तलाठी यांची एक साखली
निर्माण झाल्याचे चित्र आपणास दिसेल.ज्यामधे सोयाबीन चे वाटप असेल,लाल्या रोगाचे वाटप असेल,जमिनीचा
फेरफार असेल किंवा अवर्षण किंवा अतिव्रष्टिचे वाटप असेल यामधे सर्वत्र भ्रष्टाचाराचा अतिरेक झाल्याचे
निदर्शनास येते।
दूसरी देखिल खाती जसे सा.बां.विभाग,जलसंपदा विभाग यामधे सुधा सचिव,मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता,
कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता कनिष्ठ अभियंता यांची काम करण्याच्या पद्धतीत भ्रष्टाचाराच्या
माध्यमातून विशिष्ट प्रकारची साखली निर्माण झाल्याचे एक चित्र आपणास पहावयास मिलते.मागील १० ते १५वर्षाच्या कालापासून वरिष्टांचे कनिश्तावर कामाविषयी नियंत्रण हलू हलू कमी होत गेल्याचे चित्र दिसून येते।
कालमानाप्रमाने जर सर्व शासकीय कर्मचार्याचे ( वरिष्ट ते कनिष्ट ) आर्थिक परिस्थितीचे तुलनात्मक परिक्षण
केल्यास असे दिसून येईल की शासनाच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी अधिकाधिक संपन्न सामान्यजनता अधिकाधिक विपन्न झाल्याचे दिसून येते।
हीच परिस्थिति पोलिस खाते,विद्युत खाते,शिक्षण खाते स्थानिक स्वराज्य संस्था यामद्धेही दिसून येईल।
स्थानिक स्वराज्य संस्थामाधिल निवडून आलेले प्रतिनिधि त्यांच्या प्रभागातिल विकासाची कामे करण्या पेक्षा
स्वत: कामाची ठेकेदारी करुन अधिकाधिक संपन्न कसे होता येईल हेच पाहताना दिसत आहेत।
आज अधिकारी,निवडून दिलेले प्रतिनिधि हे नैतिकता,सामाजिक बांधिलकी या सर्व नितिमुल्याना तिलांजलि
देवून आपले घर कसे अधिकाधिक संपन्न होइल याकडेच जास्त लक्ष देत आहेत असे चित्र दिसेल।
महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास वरील परिस्थितीत बदल करावयाचा असेल तर सहाव्या वेतनआयोगाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारास " आता बस्स ...... झाले तेवढे पुरे झाले" हे घोषवाक्य ब्रीदवाक्य म्हणुनअधिकार्याना आचरणात आनन्यास भाग पाडावे।
माननीय मुख्यमंत्री व त्यांच्या सल्लागारानी एखाद्या रशियन राज्यक्रान्तिची किंवा फ्रेंच राज्यक्रान्तिची वाट न
पाहता भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हे परिवर्तन घड़विल्यास न भूतो न भविष्यति ठरेल व हे कार्य आपल्याच कालात व्हावे ही साइचरनि प्रार्थना।
जय हिंद जय महाराष्ट्र
महादेव कापूसकरी
बसमथनगर जी। हिंगोली।
मोबा.9423141008

No comments: