Powered By Blogger

27 April, 2012

राहुल गांधींचा सातारा दौरा

राहुल गांधी यांच्या सातार्याच्या दौर्यामुळे तेथील दुष्काळ एकदम नाहीसा होईल का असा प्रश्न करणेच चुकीचे आहें असे वाटते.कारण प्रत्येकाला हे माहित आहें की अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने भेट दिल्याने तेथील दुष्काळी परिस्थिती बदलू शकत नाही. पण अशी एक व्यक्ती अशा ठिकाणी भेटीला येत आहें हि गोष्ट सुद्धा त्या व्यक्तीचे असामान्यत्व सिद्ध करून जाते.
दुष्काळी भागात स्वत: जावून तेथील पिडीत लोकांच्या वेदना जाणून घेण्याची जाणीव होणे हा संवेदनशीलतेचा भाग आहें जो की प्रत्येक नेत्यामद्धे आढळत नाही.मी व्यक्तिश: राहुल गांधी यांचा आदर करतो कारण काहीतरी वेगळेपण या तरुणात आहें.
मुंबई ला येवून लोकल ने प्रवास करणे,उपनगरातील स्टेशन समोरील ATM मधून पैसे काढणे,मजुरांसोबत काम करणे,एखाद्या गरीब नागरिकाच्या झोपडीत जाऊन रात्रभर खाटेवर झोपून मुक्काम करणे,इत्यादी गोष्टी करणे म्हणजे केवळ स्टंट करण्यासाठी आहेत हे मी मानत नाही .यासाठी एक प्रकारची जिगर लागते आणि ती जिगर गांधी घराण्यातील या तरुनामद्धे निश्चितपणे पुरेपूर आहें .
सातारा येथील दुष्काळ पिडीत लोकांच्या भावना जाणून घेवून त्यांच्यासाठी काय करता येईल अशा भावनेनेच हि भेट असावी .
                                                                         महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                                                                         बसमतनगर जी.हिंगोली
                                                                         मो. 9423141008  

No comments: