Powered By Blogger

15 August, 2011

लोकपाल बिलासाठी अण्णांचे उपोषण

उद्या दि.१६-०८-२०११ पासून सुरु होणार्या अण्णांच्या उपोषणाला दिलेली परवानगी सरकारने नाकारल्याचे वाचूनअतिशय खेद वाटला आणि सरकारचा हा दुर्दैवी निर्णय म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावे लागेल. हजारोकोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून वर अशी दडपशाही जर हे सरकार करत असेल तर नक्कीच जयद्रथाचे काय झालेतसे ह्या मुजोर सरकारचे होणार आहें असे दिसते.एकीकडे भयंकर महागाईचे दुष्टचक्र,शेतकऱ्यांच्या गरजाभागविण्यास सरकारची असमर्थता आणि खते व बियाण्यासाठी मिळविण्यासाठी ची त्यांची केविलवाणी धडपडआणि वरून पळणार्या निष्पाप शेतकर्याना पाठीत बंदुकीच्या गोळ्या हे चित्र अत्यंत विदारक आणिसर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारे आहें.
anaa जे काम करीत आहेत ते काम खरे तर विरोधी पक्षाचे आहें पण अक्षरश: षंढ झाला आहें भरत देशातीलविरोधी पक्ष .
चार शेतकरी मृत्यू पावले ,कोणते नेते त्यांच्या नातेवाईकाना भेटले?
केंद्रीय कृषिमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांचे कर्तव्य नव्हते?
पाच लाख नाही दहा लाख जरी दिले तरीही त्यांच्या कुटुंबियांच्या वेदना,दुक्ख: तसूभरही कमी होवू शकत नाहीत.
अण्णा जे काही करत आहेत ते सर्व जनतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात आहें त्यामुळे सरकारने असे मुळीच समजूनये कि जसे रामदेव बाबांचे आंदोलन दडपले तसे अन्नांचेही दडपता येयील.
ज्वालामुखी प्रमाणे उसळी मारून उद्रेक बाहेर आल्यावर काय परिणाम होवू शकतो याचा विचार सरकारने सारासारबुद्धीने करावा असे वाटते.

महादेव विश्वनाथ कापुसकरी
बसमथ
नगर जी. हिंगोली.
मो. 9423141008

No comments: