

IPL क्रिकेट बद्दलबोलाल तेवढकमीच आहें.कालचवर्तमानपत्रातबातमी आली किनांदेड येथे IPL क्रिकेट वर satta सुरु असतानापोलिसांनी काहीप्रतीष्ठीताना अटकझाली.आणि लाखोरुपये जप्त करण्यात आले.केवळ २०-२० ओवर्स च्या या सामन्यासाठी लोकांचे ( सामान्य जनतेचे ) किती पैसेजातात आणि या सामन्याचे संयोजक आणि तसेच या सामन्यांमद्धे खेळत असलेल्या संघांचे मालक किती रुपयेकमावतात हि आकडेवारी पाहिल्यास आपणास थक्क होण्याची वेळ येईल.माझी लोकमत ला विनंती आहें कि याआकडेवारीची सखोल चौकशी करून जनतेपुढे आणावी म्हणजे आपले क्रिकेट वेड हे कोणाचे खिसे भरत आहें यागोष्टीची जाणीव सामान्य क्रिकेट प्रेमीना होईल आणि त्यांचे डोळे उघडतील.
नीता अंबानी,प्रीती झिंटा,विजय मल्ल्या,शाहरुख किंवा अजून जे कोणी हे मालक लोक आहेत त्यांनी कधीमेळघाटातील कुपोषित बालके पाहिली आहेत?
ग्रामीण भागातील शेतकर्याना किती अवघड परिस्थितीतून जावे लागते हे त्यांनी कधी पाहिले आहें?
झोपडपट्टीतील असंख्य लहान बालके आपले बालपण विसरून जीवाला न झेपणारी कामे करतात हे या लोकांनीपाहिले आहें काय ?
उकीर्ड्यावरील अन्नाचे कन शोधणारी भिकाऱ्यांची लहान बालके या लोकांनी कधी पाहिली आहेत?
चौकार ,षट्कार मारला कि आपल्या उघड्या मांड्या दाखवीत नाचणार्या cheer girls ला लालचावनार्या नजरेनेन्याहालाण्यार्या प्रेक्षकाना तरी जाणीव व्हावी कि आज आपण हजारो रुपयांचे तिकीट काढून हा सामना बघतआहोत पण खिसे कोणाचे भरत आहोत व किती भरत आहोत?
त्या पेक्षा वर उपस्थित केलेल्या दुर्बल घटकांसाठी जर काही करता आले तर बरेच काही सार्थक होईल.
पण लक्षात कोण घेतो ?
महादेव विश्वनाथ कापुसकरी
Basmatnagar जी. हिंगोली.
मो .9423141008