Powered By Blogger

01 March, 2013

आपला शेतकरी

शेतकर्या च्या मुलभूत प्रश्नाबाबत आणि त्यांच्या अडचणी बाबत लिहिणारे आणि बोलणारे खूप नेते आहेत  पण आजपर्यंत सर्व सामान्य शेतकरी या वर्गाला कुणीच वाली नाही हे दुसरे सत्य आहे. उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव जो पर्यंत शेतकर्याला मिळत नाही तो पर्यंत या शेतकर्याला कोणी सुखी पाहू शकणार नाहि.
आज आपण पाहतो कि साध्या टाचणी पासून ,टूथ पेस्ट ,खिळे ,नट बोल्ट ,इत्यादि इत्यादी वस्तू पासून मोठया उत्पादनाकडे पहा प्रत्येकाला आपण उत्पादित केलेल्या वस्तूचे उत्पादन खर्च लावून त्यांवर आपला नफा लावून आणि त्या वस्तूंवर किमत सुद्धा छापण्याची मुभा आहे त्यामुळे सर्वाना त्यांचा नफा निश्चित मिळण्याची हमी आहे. पण जगाच्या पाठीवर केवळ भारतीय शेतकरी हा एकच घटक असा आहे कि याने वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस राब राब राबायचे आणि कष्टातून मिळालेल्या उत्पादनाचा भाव मात्र ठरविण्याचा हक्क यां दुर्दैवी घटकाला मुळीच नाहि. हा काय न्याय आहे ?
अनेकाना शेतकर्याबद्दल सहानुभूती आहे ,अनेक जन त्यावर लिहितात सुद्धा. पण न्याय देण्यासाठी ठोस कार्य करणारे कोणीच नाहि ?
मी स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या सर्व वेदना ,व्यथा मी समजू शकतो आणि स्वत: सुद्धा अनुभवतो. पण करणार काय ?
कधी कधी मनाचा खूप उद्वेग होतो ,मन संवेदनशील असल्यामुळे मनाला या गोष्टींमुळे वेदना होतात पण या निगरगट्ट आणि भ्रष्टाचाराणे बरबटलेल्या राजकीय नेत्यांना शेतकर्या साठी दयेचा पाझर कधी फुटेल हे आपण कसे सांगू शकणार ?

No comments: