Powered By Blogger

06 October, 2011

कोण म्हणतो हा देश कृषिप्रधान आहें ?

जेव्हा जेव्हा म्हटले जाते कि " भारत हा कृषिप्रधान देश आहें " किंवा " भारतीय अर्थव्यवस्थेचा कना आहें " असे म्हणताना काय अपेक्षित असते ? कौतुक कि उपहास ?
तसे पाहिले तर या क्षणाला हा नक्कीच उपहास आहें.कारण वातानुकुलीत केबिन मद्धे बसून शेतीबद्दल किंवा शेतकर्याबद्दल वाट्टेल तशी वक्तव्ये करणार्या राजकीय पुढार्यांनी शेतकऱ्यांच्या प्राथमिक गरजा,त्यांच्या दैनंदिन वेदना,त्यांची सदैव असलेली आर्थिक विवंचना यांचा कधी अभ्यास केला आहें ?
तेव्हा " कृषिप्रधान " किंवा " अर्थव्यवस्थेचा कना ",देशाचा पोशिंदा " इत्यादी इत्यादी जे बोलले जाते ते अक्षरश: थोतांड आहें.
या देशाला कृषिप्रधान मानावे अश्या पावूलखुना कुठेही प्रतिबिंबित होताना दिसत नाहीत.या देशातल्या राजकीय नेत्यांच्या डोक्यात शेतकरी प्रथमस्थानी कधीच नव्हता आणि आजही नाही.
देशातील थोर-महान विचारवन्तांच्या वैचारिक बैठकीचा केंद्रबिंदू " शेती आणि शेतकरी " कधीच नव्हता आणि आजही नाही.मग हा देश कृषिप्रधान कसा ? केवळ तुम्ही आम्ही म्हणतो म्हणून ?
देशाच्या अर्थसंकल्पात शेतीवरील बजेट ला कितवे स्थान ?
दूरदर्शन वर शेती आणि शेतकरी या विषयाला कितवे स्थान ?
वर्तमानपत्रांमद्धे शेती आणि शेतकर्याला कितवे स्थान ?
लोकसभा/राज्यसभा/विधानसभा अधिवेशनात शेतीला कितवे स्थान ?
एवढे जरी तपासून पाहिले तर भारत हा कृषिप्रधान देश आहें असे म्हणण्याचे धाडस कोणी करू शकेल असे वाटत नाही.
म्हणे  शेतकरी राजा !, " बळीराजा !
अहो राजा कोणाला म्हणावे ?... ज्याला उन्हातान्हात रांगेत उभे राहून आणि पोलिसांच्या काठ्या खाऊन आणि रोख पैसे देवूनही खते आणि बियाणे उपलब्ध करून दिले जात नाही त्याला ?
ज्याला उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव दिल्या जात नाही तो राजा ?
१२-१२ तास भारनियमन असताना विहिरीतील पाणी पिकांना देवू शकत नाही तो राजा ?

या तथाकथित  राजाचे शोषण करण्यासाठी मात्र सर्वच जन बाह्या सरसावून बसलेले ...त्याचा माल बाजारात विकायला येताच भाव निम्म्यावर ...
आणि माल व्यापार्याच्या गोदामात गेला कि शासनाचा निर्यातीचा निर्णय जाहीर..म्हणजे अर्थातच व्यापार्याला दुप्पट भाव...
तरीही बिचारा हा असंघटीत घटक निमुटपणे सारे काही सहन करणार कारण अति सहनशीलता ...
किती शोषण करणार ? पुरे झाले आता...
१७६००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्या ए.राजा, खासदार कनिमोझी,सुरेश कलमाडी इत्यादी दिग्गजाना
जेलमद्धेही पंचतारांकित सुविधा आणि या बिचार्याने काही हजारांचे विजेचे बिल भरले नाही कि याची वीज कट...
हा कुठला न्याय ?
जर शासकीय आकडेवारी प्रमाणे देशात ७० टक्के शेतकरी असतील तर केंद्रीय अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी किती तरतूद असावी याचा मापदंड गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे ज्या दिवशी ठरविला जाईल तो दिवस या तथाकथित राजासाठी सोन्याचा दिवस ठरेल.
                                                                                             महादेव विश्वनाथअप्पा कापूसकरी
                                                                                             एक शेतकरी,बसमथनगर जी.हिंगोली.

14 September, 2011

द्विपक्षीय निवडणूक पद्धत असावी


खरे तर भारतासारख्या विशालप्राय देशात इंग्लंड प्रमाणे लोकशाही असावी जेथे Democratic party आणि Republican party अशा दोनच पक्षांच्या फळ्या असाव्यात असे मला प्रामाणिकपणे वाटते.
आपल्या भारत देशात अनेक प्रादेशिक पक्ष असल्यामुळे निवडणुकीत मतदान करताना लोकाना विविध अनेक पर्याय असतात.काही लोक पक्षाचे कार्य न पाहता धार्मिक पातळीवर असलेल्या धोरणाप्रमाणे तर काही लोक जातीपातीच्या पातळीवरील धोरणाप्रमाणे मतदान करतात त्यामुळे एखाद्या विशिष्ट पक्षाचे बहुमत न येता त्रिशंकू अवस्थेत निकाल येतात आणि अनेक पक्षांची मदत घेवून सरकार तयार करावे लागते.ज्यामुळे ह्या सरकारला काही धोरणात्मक निर्णय घेताना या सर्वच लोकांचा विचार त्यावर घ्यावा लागतो.दुसरे म्हणजे विरोधी पक्षातही अनेक पक्षाचे लोक असल्यामुळे त्यांच्यातही अनेक प्रकारचे मतभेद असतात त्यामुळे त्यांच्यातही बळकटी येत नाही.
या सर्व गोष्टींमुळे हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष हे दोनच पक्ष असले पाहिजेत जेणेकरून सत्तेवर असलेला एक पक्ष आणि उर्वरित पक्ष म्हणजे विरोधी पक्ष असे स्वरूप असेल त्यामुळे विरोधी पक्षसुद्धा बळकट असेल त्यामुळे सत्तेवरील पक्षाला स्वैर वागता येणार नाही कारण वेसन विरोधी पक्षाकडे असेल.
देशातील सर्व बुद्धीजीवी वर्ग,सुजाण नागरिक,ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक,समाजसेवक इ.लोकांनी सर्वंकष विचारविनिमय करून असे जर करता आले तर हा भारत देश जगाच्या पाठीवर आपले सार्वभौमत्व निर्विवाद सिद्ध करू शकेल यात तिळमात्र शंका वाटत नाही.

04 September, 2011

भ्रष्टाचाराविरुद्ध लस तयार करण्याची गरज


आज आपल्या भारत देशात हाफकिन Institute ,भाभा Institute ,सारख्य्या नामवंत संस्था कडून अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांवर लस तयार केली जाते ज्यामुळे अश्या लसिद्वारे अनेक प्रकारच्या रोगप्रतिकारक जंतूंची आपल्या शरीरात निर्मिती केली जाते आणि हे लासिद्वारे शरीरात inject केलेले जंतू आपल्या शरीरात असलेल्या अनेक प्रकारच्या रोगांच्या जंतुना मारून टाकतात आणि त्यामुळे रोगांचे समूळ उच्चाटन होते आणि मनुष्य रोगमुक्त होतो.
आज आपल्या देशात भ्रष्टाचार या रोगाची लागण फार मोठ्ठ्या प्रमाणात झाली असून या भ्रष्टाचाराच्या रोगावर प्रतिकारक लस शोधणे अत्यंत गरजेचे झाले आहें. देशातील सर्व नामवंत संस्थामधील सर्व शास्त्रज्ञांना सरकारने स्पेशल आदेश देवून VACCINE AGAINST CORRUPTION हि लस शोधून तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
हि लस तयार केल्यानंतर देश पातळीवर लसीकरण मोहीम राबवावी. जसे पोलिओ लसीकरण देशपातळीवर सर्वत्र राबविले जाते,तसे स्वरूप या लसीकरणाचे असावे.देशातील सर्व सरकारी कर्मचारी ( शिपायापासून ते पंतप्रधानापर्यंत आणि न्यायाधीशांपासून ते आमदार खासदारांपर्यंत आणि नगरसेवकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत ) या सर्वाना हि लस टोचण्यात यावी जेणेकरून भ्रष्टाचाराचे सर्व जंतू कायमचे नष्ट होण्यास मदत होईल.या लसिमद्धे समाविष्ट असलेल्या जन्तुन्मद्धे असा गुणधर्म असावा कि ज्याप्रमाणे संगणक व्हायरस घुसल्यावर जसे त्यातील फायली नष्ट करतो आणि संगणक जाम होतो त्याप्रमाणे जर कोणी भ्रष्टाचारी व्यक्ती गैरव्यहाराद्वारे काही रक्कम स्वीकारीत असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीचा मेंदू जाम करण्याची क्षमता या vaccine मद्धे असावी. या लसी च्या शोधामुळे जगभरात भ्रष्टाचारामुळे भारताची खराब झालेली प्रतिमा सुधारण्यास खूप मदत होईल आणि समाजातील सर्व स्तरातील नागरिक समाधानाचा श्वास घेतील.
महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
संचालक,श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक ली.
बसमतनगर जी.हिगोली.
E-mail -mvkapuskari@gmail.com

28 August, 2011

हि कसली समानता ?


महाराष्ट्रात पोळा हा सन शेतकऱ्याच्या दृष्टीने एक महत्वाचा सन म्हणून साजरा केला जातो.या सणाच्या दिवशी बैलांची पूजा करून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यापूर्व कालापासून चालत आलेली एक अनिष्ट प्रथा मनाला खटकते.ती म्हणजे मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा मान म्हणून त्या त्या गावातील पोलीस पाटील किंवा जो कोणी पूर्वापार मानकरी असेल त्याला दिला जातो व जोपर्यंत त्याचे बैल प्रदक्षिणा घालणार नाहीत तोपर्यंत इतर कोणाचेही बैल प्रदक्षिणा घालू शकत नाहीत.
मानकरी त्या दिवशी मुद्दामच बैल उशिरा वाजत गाजत व जागोजागी थांबत मंदिरात येतात आणि तोपर्यंत इतर शेतकरी बिचारे ताटकळत बसतात.या सर्व प्रकारामाद्धे आश्चर्याची गोष्ट म्हणजे मानाकार्याच्याच बैल्जोडीने पहिल्यांदा प्रदक्षिणा घालावी म्हणून बंदोबस्तात त्या दिवशी मुद्दाम वाढ केली जाते व अनेक खेद्यांमाद्धे हा प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून अनेकवेळा मारामारी होते व याकामी शासनाचे बंदोबस्तासाठी लाखो रुपये खर्च होतात .पण हि कसली समानता ? लोकशाहीतील नीतीमूल्यांची फसवणूक व दुर्बल आणि असंघटीत श्त्कार्यांची अक्षरश: कुचंबणा नव्हे काय ?
आज लोकशाही असलेल्या या भारत देशात अण्णा हजारे सारख्या ७४ वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तीला १३ दिवस उपोषण केल्यावर कुठे शासनाला जाग आली आणि हा घोर संघर्ष यशस्वी झाला.दुक:ख असे आहें कि अशा अनिष्ट प्रथा जोपासण्यासाठी शासकीय बळ वापरले जाते तेथे समानतेची अपेक्षा बिचार्या शेतकऱ्यांनी काय म्हणून करावी ?
महादेव विश्वनाथ कापुसकरी
बसमथ नगर जी. हिंगोली.
मो.9423141008

15 August, 2011

लोकपाल बिलासाठी अण्णांचे उपोषण

उद्या दि.१६-०८-२०११ पासून सुरु होणार्या अण्णांच्या उपोषणाला दिलेली परवानगी सरकारने नाकारल्याचे वाचूनअतिशय खेद वाटला आणि सरकारचा हा दुर्दैवी निर्णय म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावे लागेल. हजारोकोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून वर अशी दडपशाही जर हे सरकार करत असेल तर नक्कीच जयद्रथाचे काय झालेतसे ह्या मुजोर सरकारचे होणार आहें असे दिसते.एकीकडे भयंकर महागाईचे दुष्टचक्र,शेतकऱ्यांच्या गरजाभागविण्यास सरकारची असमर्थता आणि खते व बियाण्यासाठी मिळविण्यासाठी ची त्यांची केविलवाणी धडपडआणि वरून पळणार्या निष्पाप शेतकर्याना पाठीत बंदुकीच्या गोळ्या हे चित्र अत्यंत विदारक आणिसर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारे आहें.
anaa जे काम करीत आहेत ते काम खरे तर विरोधी पक्षाचे आहें पण अक्षरश: षंढ झाला आहें भरत देशातीलविरोधी पक्ष .
चार शेतकरी मृत्यू पावले ,कोणते नेते त्यांच्या नातेवाईकाना भेटले?
केंद्रीय कृषिमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांचे कर्तव्य नव्हते?
पाच लाख नाही दहा लाख जरी दिले तरीही त्यांच्या कुटुंबियांच्या वेदना,दुक्ख: तसूभरही कमी होवू शकत नाहीत.
अण्णा जे काही करत आहेत ते सर्व जनतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात आहें त्यामुळे सरकारने असे मुळीच समजूनये कि जसे रामदेव बाबांचे आंदोलन दडपले तसे अन्नांचेही दडपता येयील.
ज्वालामुखी प्रमाणे उसळी मारून उद्रेक बाहेर आल्यावर काय परिणाम होवू शकतो याचा विचार सरकारने सारासारबुद्धीने करावा असे वाटते.

महादेव विश्वनाथ कापुसकरी
बसमथ
नगर जी. हिंगोली.
मो. 9423141008

30 July, 2011

भारतरत्न पुरस्कार आणि सचिन तेंडूलकर

सचिन ला इतक्यातच भारतरत्न पुरस्कार देणे योग्य आहें का? हा प्रश्न आपण उचलला याबद्दल आपले अभिनंदन.
कारण कि मनातून कितीही वाटत असले तरीही याबाबत असलेल्या राजकीय दबावामुळे आणि भीती पोटी कोणीहीबोलायला तयार नाही.
खरे तर क्रिकेट हा खेळ भारतीय प्रेक्षकांनी वाजवीपेक्षा जास्त लोकप्रिय केला आहें हे माझे मत.
या खेळात प्रसिद्धी आणि पैसा दोन्हींचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त आहें.
त्यामानाने जागतिक पातळीवरील प्रथम क्रमांकाचे गुणांकन मिळालेले विश्वनाथन आनंद ,गीत सेठी,हॉकी तीलध्यानचंद,या लोकाना घ्यायला देखील विमानतळावर कोणी जात नाही आणि क्रिकेट चे खेळाडू मात्र इतके लाडकेकि पोलीस बंदोबस्तात आणि पत्रकारांच्या गराड्यात ,दूरदर्शन चे क्यामेरे आणि त्यांचे खटाखट flash हे कितीविसंगत आणि इतर खेळांवर अन्याय करणारे नव्हे काय?
जेव्हा सचिनला भारतरत्न देण्याविषयी चर्चा होते तेव्हा काय वाटत असेल विश्वनाथन आनंदला ?
मी तर असे म्हणेन कि हे सर्व सचिन ने स्वत: होवून थांबवायला हवे आणि नम्रपणे हा पुरस्कार मला देवू नये असेसांगायला हवे.
सचिन ची कामगिरी खूप मोठी आहें आणि देशासाठी त्याचे योगदान मोठे आहें यात कसलेही दुमत नाही.पणभारतरत्न हा पुरस्कार काही लहान नाही.कि इतक्या सहजपणे आणि मुद्दाम एका व्यक्तीसाठी घटनेत दुरुस्ती करूनइतकी घाई करून गडबडीने पुरस्कार देण्याचा घाट घातला जातोय.
मला असे वाटते कि घटनाच बदलायची असेल तर कसाब ला फाशी देण्यासाठी बदला ,भ्रष्टाचार करणारया राजकीयआणि बड्या पांढरपेशा गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी बदला.कलमाडी सारखे नेते डॉक्टर आणि बडे वकील यांच्यासाह्याने स्मृतीभांश झाल्याचे नाटक करीत आहें आणि बिचारी भारतीय जनता निर्विकार पने हे सर्व प्रकार ऐकूनघेतेय.येथे घटना का बदलत नाहीत?
करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराने बरबटलेले k .राजा,कानिमोझी सारख्या नेत्यांना फासावर चढविण्यासाठी घटनाबदला.
खरोखरच सामान्य जनता आनंदित होईल.आणि हे सर्व करण्यासाठी घाई काही नाही पण सचिन ला भारतरत्न मात्रलवकरात लवकर मिळाला पाहिजे असे हे राजकारण किती दिवस चालणार?
· · Share · Delete





04 July, 2011

मंदिरातील खजिना

भारतातील अनेक मंदिरातील अश्या प्रकारच्या खजिन्याचा काय उपयोग ?
हा सर्व खजिना जर भारतातील अर्थव्यवस्थेत समाविष्ट झाला तर देशातील सर्व गरीब आणि दारीद्र्यारेशेखालीलहोतकरू बुद्धिमान तरुणांना आपण उच्च शिक्षण देवू शकू.विशेषता:ग्रामीण भागातील अनेक शेतकरी असंख्यप्रकारच्या अडचणींचा सामना करीत आहेत त्यांच्या मदतीसाठी हा खजिना कमी येत असेल तर आज भारत देशहा जागतिक महासत्ता बनू शकतो.
माझ्या मते अश्या प्रकारच्या मंदिरान्मद्धे दान करणारे सामान्य नागरिक मूर्ख ठरत आहेत .आज आपण पाहतोसाई मंदिरातील पैसा बाहेर जात असताना अनेकवेळा पकडला गेला आणि त्याचा खुलासा विश्वस्त देवू शकलेनाहीत.एकंदरीत लोकांनी दिलेल्या पैश्याचा विनियोग कसा होतोय हे पारदर्शक असले पाहिजेत.नसता सर्व पैसाराष्ट्रीय संपत्ती म्हणून वापरला गेला पाहिजे पण तेथेही भ्रष्टाचार विरहित कारभार असला तरच उपयोगआहें.

19 June, 2011

सत्यसाइन्ची अफाट संपत्ती

श्री सत्यसाइन्च्या खोलीत नुकताच खजिना मिळाल्याचे सर्वांनी वाचलेच असेल.हि सर्व संपत्ती dead असल्यासारखीच आहें.अशा प्रकारच्या सर्व देवस्थानांच्या dead संपत्तीचा शासनाने ताबा जर घेतला तर भारतातील सर्व जनतेला या संपत्तीचा लाभ घेता येईल आणि गरीब आणि गरजू बुद्धिमान विद्द्यार्थ्याना उच्च शिक्षणासाठी अश्या संपत्तीची मदत झाली तर हि फार मोठी उपलब्धता असेल या कामी सर्व राजकीय नेत्यांनी प्रामाणिकपणे लक्ष घालून व्यवस्थितपणे हा प्रश्न हाताळला तर नक्कीच भारत देश हा जागतिक महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.
आजही आपण पाहतो कि काही भाविक भक्त साईबाबाला सोन्याचे आसन भेट देतात तर काही भक्त सोन्याच्या धाग्यांनी विणलेली चादर भेट देतात पण अश्या प्रकारचा पैश्याचा विनियोग म्हणजे केवळ दुरुपयोग नव्हे काय?
तिरुपती बालाजी,शिर्डी चे साई बाबा इत्यादि ची अमाप संपत्ती याकामी घेता येवू शकते.

10 June, 2011

भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण

माझे स्पष्ट मत असे आहें कि बाबा रामदेव स्वर्गवासी जरी झाले तरीही सरकार आता त्यांच्यासोबत कोणत्याही वाटाघाटी करण्यासाठी येत नाही.
रामदेव बाबांनी सुद्धा आंदोलन मागे घ्यावे आणि आपला जीव वाचवावा.आपणा सर्व सामान्य लोकांचे तर दोन्ही बाजूनी नुकसान होत आहें.कारण आपल्याला योगासाठी बाबा हवेत तेही जातील आणि भ्रष्टाचार आणि काळा पैसा हे तर बंद होणारच नाही कारण सरकारची तशी इछाच दिसत नाही.
आपण अंतर्मुख होवून जर प्रामाणिकपणे जर विचार केला तर भ्रष्टाचार या विषयाशी आपण स्वत: सुद्धा तेवढेच जबाबदार आहोत.
कोणत्याही कामासाठी आपण कार्यालयात जर गेलो तर फाईल पुढे सरकण्यासाठी आपण लाच देण्यासाठी मागेपुढे पहात नाही उलट आपण समाधानी होतो कि चला आपले काम नक्की होणार.हि प्रवृत्ती सर्व लोकांच्या रक्तातच भिनली आहें.जादूच्या कांडी ने काही क्षणातच हे सर्व थांबू शकत नाही त्यासाठी कालबद्ध योजना आखावी लागेल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिक अधिकारी राबवावे लागतील तरच काही प्रमाणात तरी आळा बसू शकेल.
माझी प्रामाणिक इच्छा मी व्यक्त केली मग हे कोणाला कितपत पटेल हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहें.

07 June, 2011

बाबा रामदेव

रामदेव बाबा वर गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाचली.सरकारला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि एकेक चुकीची स्टेप घेत जनमानसात असलेली काँग्रेस ची प्रतिमा वरचेवर डागाळत चालल्याचे चित्र दिसत आहें.वरून पंतप्रधानांनी असे म्हटले आहें कि घटना वाईट परंतु दुसरा पर्याय नव्हता.रात्रीच्यावेळी झोपलेल्या आंदोलकांवर अशा प्रकारे पोलीस कार्यवाई करणे हे कोणत्याही सुजाण नागरिकाला पटणारे नाही.दिग्विजयसिंग यांचे वक्तव्य असे कि बाबा ठग आहें.अहो ठग आहें हे खरे गृहीत धरले तर तुम्ही ठगाकडे airport वर तडजोड करण्यासाठी आणि तुमच्या मागण्या मान्य आहेत असे सांगत कसे काय गेलात? तो तर ठग आहें ना....
सामान्य नागरिकाना काहीच घेणे देणे नाही फक्त भ्रष्टाचार ह्या मुद्द्यावर देशातील बहुसंख्य बुद्धीजीवी बाबाना नक्कीच समर्थन देणारे आहेत याबद्दल काहीच शंका नाही.
राज ठाकरे यांचे statement मात्र नक्कीच विचार करायला लावणारे आहें कि या देशातील विरोधी पक्ष काय करत आहें?विरोधी पक्षाने उचालावायाचे प्रश्न अण्णा हजारे,रामदेवबाबा हे आंदोलनाद्वारे उचलीत आहेत आणि देशातील सर्व विरोधी पक्ष त्याना पाठींबा देत आहें हे चित्र नक्कीच दुर्दैवीआहें.

13 May, 2011

IPL CRICKET




IPL क्रिकेट बद्दलबोलाल तेवढकमीच आहें.कालचवर्तमानपत्रातबातमी आली किनांदेड येथे IPL क्रिकेट वर satta सुरु असतानापोलिसांनी काहीप्रतीष्ठीताना अटकझाली.आणि लाखोरुपये जप्त करण्यात आले.केवळ २०-२० ओवर्स च्या या सामन्यासाठी लोकांचे ( सामान्य जनतेचे ) किती पैसेजातात आणि या सामन्याचे संयोजक आणि तसेच या सामन्यांमद्धे खेळत असलेल्या संघांचे मालक किती रुपयेकमावतात हि आकडेवारी पाहिल्यास आपणास थक्क होण्याची वेळ येईल.माझी लोकमत ला विनंती आहें कि याआकडेवारीची सखोल चौकशी करून जनतेपुढे आणावी म्हणजे आपले क्रिकेट वेड हे कोणाचे खिसे भरत आहें यागोष्टीची जाणीव सामान्य क्रिकेट प्रेमीना होईल आणि त्यांचे डोळे उघडतील.
नीता अंबानी,प्रीती झिंटा,विजय मल्ल्या,शाहरुख किंवा अजून जे कोणी हे मालक लोक आहेत त्यांनी कधीमेळघाटातील कुपोषित बालके पाहिली आहेत?
ग्रामीण भागातील शेतकर्याना किती अवघड परिस्थितीतून जावे लागते हे त्यांनी कधी पाहिले आहें?
झोपडपट्टीतील असंख्य लहान बालके आपले बालपण विसरून जीवाला झेपणारी कामे करतात हे या लोकांनीपाहिले आहें काय ?
उकीर्ड्यावरील अन्नाचे कन शोधणारी भिकाऱ्यांची लहान बालके या लोकांनी कधी पाहिली आहेत?
चौकार ,षट्कार मारला कि आपल्या उघड्या मांड्या दाखवीत नाचणार्या cheer girls ला लालचावनार्या नजरेनेन्याहालाण्यार्या प्रेक्षकाना तरी जाणीव व्हावी कि आज आपण हजारो रुपयांचे तिकीट काढून हा सामना बघतआहोत पण खिसे कोणाचे भरत आहोत किती भरत आहोत?
त्या पेक्षा वर उपस्थित केलेल्या दुर्बल घटकांसाठी जर काही करता आले तर बरेच काही सार्थक होईल.
पण लक्षात कोण घेतो ?
महादेव
विश्वनाथ कापुसकरी
Basmatnagar जी. हिंगोली.
मो
.9423141008

04 May, 2011

दुर्दैवी निर्णय


सत्य साईच्या प्रशांती नीलयम आश्रमात साई कुलवंतसभागृहात त्यांचा पुतळा उभारण्यासाठी सचिन तेंडूलकरयाने तीस लाख रुपये खर्च करून त्यावर सोन्याचा मुलामादेण्याचाही खर्च करण्याची जवाबदारीही त्याने स्वीकारलीआहे असे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.
मी व्यक्तीशः सचिन तेंडूलकर चा चाहता आहे.आणि त्याचामला अत्यंत आदर आहें.मात्र पुतळ्याबद्दल खर्च करण्याचात्याचा निर्णय दुर्दैवी आहे असे मला वाटते.त्यापेक्षा त्यानेएखाद्या बुद्धिमान परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च करावेत किंवामेळघाटातील कुपोषित बालकांच्या पोशनाचा खर्च करणारया एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी म्हणून द्यावेतकिंवा ग्रामीण भागातील गरीब महिलांसाठी मोफत प्रसुतिग्रह काढण्यासाठी किंवा ग्रामीण भागातीलबालकामगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खर्च करावेत.अर्थात हि लांबलचक यादी लिहिण्यामागे सचिनची श्रद्धा दुखावण्याचा मुळीच उद्देश नाही.परंतु एवढ्यासाठीच वाटते कि अत्यंत श्रीमंत असलेल्या या trust ला पैसेदेण्यापेक्षा ज्याना पैशाची अत्यंत निकड आहे अशाच सामाजिक संस्थेकडे हा ओघ जावा हि प्रामाणिक भावनाआहे.
महादेव
विश्वनाथ कापुसकरी
बसमत्नगर
जी.हिंगोली
मो
.9423141008

10 April, 2011

अण्णांच्या उपोषनावरील टीका

अण्णांनी उपोषण सोडले पण हे हितसंबंधांचे राजकारण आहे अशी जी टीका होत आहे हि अत्यंत चुकीची आहे असे वाटते.एक तर १२१ कोटींच्या या देशात हा एकच हिरा निघाला ज्याने लोकपाल विधेयक या अतिशय ज्वलंत विषयावर हिमतीने आमरण उपोषण करून त्याची यशस्वी सांगता केली .
अहो टीका करायला काय लागते ? मिडीया ला तर आज खाद्यच हवे .( माफ करा हं मिडीयावाले ) .मी तर असे म्हणेन कि जसे अश्या प्रकारची टीका करणारे अनेक जन आज पुढे येत आहेत अगदी अश्याच प्रकारे अण्णा हजारे सारखे हजारो अण्णा जर तयार झाले तर हा भारत देश जगभरात महासत्ता म्हणून नक्कीच ओळखला जाईल.अण्णांची प्रेरणा घेऊन खरोखरच तरुण वर्गाने पुढाकार घेतला तर " सारे जहान से अच्छा हिंदोस्तान हमारा " हे गीत नक्कीच खरया अर्थाने सार्थठरेल.

05 April, 2011

अण्णा हजारे आणि लोकपाल बिल


लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी आज पासूनआमरण उपोषण सुरु केले आहे त्याला कोणत्याही सुजाणभारतीय नागरिकाचा नक्कीच पाठींबा असणार आहेकिंबहुना मी स्वतः तर या साठी सक्रीय म्हणजेच उपोषणसुद्धा करायला तयार आहे आणि असे कित्येक नागरिकआहेत जे कि अण्णा च्या कोणत्याही कृतीला डोळे झाकूनपाठींबा देतात कारण कि अण्णा जे काही करतात तेनागरिकांच्या हितासाठीच असते.
लोकपाल विधेयक काय आहे हे सर्वच सामान्य जनतेलाकदाचित माहितहि नसेल परंतु आता ibn लोकमत ने माहित करून दिले कि नेमके भ्रष्टाचारी नेते या लोकपालविधेयकात कसे अडचणीत येऊ शकतात.जे भ्रष्टाचारी आहेत ते नक्कीच शिक्षेस पात्र आहेत याबद्दल कोणाचेहीदुमत असण्याचे काहीच कारण नाही.केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून अन्नाना फार मोठ्याप्रमाणावर पाठींबा मिळेल याची मला तर खात्रीवाटते.

18 March, 2011

हसन अली " The Great "


मार्च २००७ मध्ये हसन आली याच्या पुणे येथील निवासस्थानी आयकरखात्याचीधाड पडली होती आणि त्यावेळेस तो एक रेस च्या घोड्यांचाव्यापारी असूनत्याचेकडे त्यावेळेस जवळपास ३५००० कोटी रुपयांचीमालमत्ता,प्रत्येकी एककोटी रुपये किमतीचे ४० रेस चे घोडे आणि स्विसबँकेत त्याच्या मालकीची १०खाती असे विवरण वर्तमानपत्रात छापूनआले होते.दैनिक सकाळ च्या दि.१३-३-२००७ रोजीच्या अंकात ई-पत्रे यासदरात " मोठ्यामाशाची जादू!"या मथळ्याखाली मी लिहिले होते कि मला या महान माणसाचा हेवावाटतो कारणलहान शहरातून छोटा मोठा व्यापार व्यवसाय करणारया वप्रामाणिकपणे प्राप्तीकर भरणार्या व्यापारयांवर अनेकदाप्राप्तीकरखात्याची वक्रद्रष्टी पडते आणि प्राप्तीकर खात्याकडून अधिकार्यांनादिलेल्या टार्गेट चे या व्यापार्यांना बळीव्हावे लागते. मात्र यापार्श्वभूमीवर हसन आली सारखे मोठे मासे काय जादू करतात कोणास ठाऊक!हसन अलीच्यामालमत्तेचे आकडे सामान्य माणसाला अचंबित करून तोंडात बोटघालायला लावणारे आहेत.२००७ मधील हिअघोषित मालमत्ता होती तर त्यावेळेसपासून ते २०११ पर्यंत प्राप्तीकर खाते काय करत होते हाही एकसंशोधनाचाविषय नव्हे काय ?आज आता ऐकलेल्या बात्म्यामध्ये असे समजले कि पुराव्या अभावी हसन आलीयाचीकोर्टाने जमानातीवर मुक्तता केली .वा रे प्राप्तीकर संचालनालय ....धन्य तो हसन आली आणि धन्य तोकायदा.......आजचे त्याच्या मालमत्तेचे आकडे ऐकल्यावर फोर्ब्स च्या यादीत त्याचे नावकसे काय नाही असेवाटल्यावाचून रहात नाही.तो ज्या सेक्टर मध्ये राहतो त्या सेक्टर मधील सर्व प्राप्तीकरअधिकार्यांशी हसन आली चेकाय संभंध आहेत हि गोष्ट तपासून पाहण्यासाठीअण्णा हजारेनाच पुढे यावे लागेल कारण दुसरया कोणाचेही वजनपडत नाही. Mahadev Kapuskari Basmathnagar Mob. 9423141008