Powered By Blogger

28 August, 2011

हि कसली समानता ?


महाराष्ट्रात पोळा हा सन शेतकऱ्याच्या दृष्टीने एक महत्वाचा सन म्हणून साजरा केला जातो.या सणाच्या दिवशी बैलांची पूजा करून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यापूर्व कालापासून चालत आलेली एक अनिष्ट प्रथा मनाला खटकते.ती म्हणजे मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा मान म्हणून त्या त्या गावातील पोलीस पाटील किंवा जो कोणी पूर्वापार मानकरी असेल त्याला दिला जातो व जोपर्यंत त्याचे बैल प्रदक्षिणा घालणार नाहीत तोपर्यंत इतर कोणाचेही बैल प्रदक्षिणा घालू शकत नाहीत.
मानकरी त्या दिवशी मुद्दामच बैल उशिरा वाजत गाजत व जागोजागी थांबत मंदिरात येतात आणि तोपर्यंत इतर शेतकरी बिचारे ताटकळत बसतात.या सर्व प्रकारामाद्धे आश्चर्याची गोष्ट म्हणजे मानाकार्याच्याच बैल्जोडीने पहिल्यांदा प्रदक्षिणा घालावी म्हणून बंदोबस्तात त्या दिवशी मुद्दाम वाढ केली जाते व अनेक खेद्यांमाद्धे हा प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून अनेकवेळा मारामारी होते व याकामी शासनाचे बंदोबस्तासाठी लाखो रुपये खर्च होतात .पण हि कसली समानता ? लोकशाहीतील नीतीमूल्यांची फसवणूक व दुर्बल आणि असंघटीत श्त्कार्यांची अक्षरश: कुचंबणा नव्हे काय ?
आज लोकशाही असलेल्या या भारत देशात अण्णा हजारे सारख्या ७४ वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तीला १३ दिवस उपोषण केल्यावर कुठे शासनाला जाग आली आणि हा घोर संघर्ष यशस्वी झाला.दुक:ख असे आहें कि अशा अनिष्ट प्रथा जोपासण्यासाठी शासकीय बळ वापरले जाते तेथे समानतेची अपेक्षा बिचार्या शेतकऱ्यांनी काय म्हणून करावी ?
महादेव विश्वनाथ कापुसकरी
बसमथ नगर जी. हिंगोली.
मो.9423141008

15 August, 2011

लोकपाल बिलासाठी अण्णांचे उपोषण

उद्या दि.१६-०८-२०११ पासून सुरु होणार्या अण्णांच्या उपोषणाला दिलेली परवानगी सरकारने नाकारल्याचे वाचूनअतिशय खेद वाटला आणि सरकारचा हा दुर्दैवी निर्णय म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावे लागेल. हजारोकोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून वर अशी दडपशाही जर हे सरकार करत असेल तर नक्कीच जयद्रथाचे काय झालेतसे ह्या मुजोर सरकारचे होणार आहें असे दिसते.एकीकडे भयंकर महागाईचे दुष्टचक्र,शेतकऱ्यांच्या गरजाभागविण्यास सरकारची असमर्थता आणि खते व बियाण्यासाठी मिळविण्यासाठी ची त्यांची केविलवाणी धडपडआणि वरून पळणार्या निष्पाप शेतकर्याना पाठीत बंदुकीच्या गोळ्या हे चित्र अत्यंत विदारक आणिसर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारे आहें.
anaa जे काम करीत आहेत ते काम खरे तर विरोधी पक्षाचे आहें पण अक्षरश: षंढ झाला आहें भरत देशातीलविरोधी पक्ष .
चार शेतकरी मृत्यू पावले ,कोणते नेते त्यांच्या नातेवाईकाना भेटले?
केंद्रीय कृषिमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांचे कर्तव्य नव्हते?
पाच लाख नाही दहा लाख जरी दिले तरीही त्यांच्या कुटुंबियांच्या वेदना,दुक्ख: तसूभरही कमी होवू शकत नाहीत.
अण्णा जे काही करत आहेत ते सर्व जनतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात आहें त्यामुळे सरकारने असे मुळीच समजूनये कि जसे रामदेव बाबांचे आंदोलन दडपले तसे अन्नांचेही दडपता येयील.
ज्वालामुखी प्रमाणे उसळी मारून उद्रेक बाहेर आल्यावर काय परिणाम होवू शकतो याचा विचार सरकारने सारासारबुद्धीने करावा असे वाटते.

महादेव विश्वनाथ कापुसकरी
बसमथ
नगर जी. हिंगोली.
मो. 9423141008