Powered By Blogger

03 June, 2013

करिअर मार्गदर्शनाची गरज

नुकतेच बारावी चे निकाल जाहीर झाले आणि दहावी चे सुद्धा लवकरच होणार आहेत असे प्रसिद्ध झाले आहे. दहावी नंतर आणि बारावी नंतर विद्यार्थ्याना कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत? आणि किती टक्के मार्क्स च्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कोर्सेस साठी प्रयत्न करावेत यासाठी त्याना मार्गदर्शन तज्ञ लोकांकडून विस्तृत प्रमाणात दूरदर्शन वरून होणे गरजेचे आहे कारण आजचे सर्वच पालक हे याबाबतची पूर्ण माहिती असणारे नसतात आणि विशेषत: ग्रामीण भागातील पालक हे तर नवीन नवीन निघालेल्या अनेक व्यावसायिक कोर्सेस बद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतात. या सर्वाना योग्य मार्गार्षानाची नक्कीच गरज असते. परंतु आज आपण पहात आहोत कि जवळपास सर्व वाहिन्या वर IPL चे फिक्सिंग,श्रीनिवासन चा राजीनामा ,दालमियाची नियुक्ती,शरद पवारांची मानहानी ,अनेकांनी व्यक्त केलेली याबाबतची मते,,इत्यादी इत्यादी वर चर्चा आणि बातम्या देण्याची मोठ्या प्रमाणावर चढाओढ लागलेली आहे असे चित्र दिसते. वास्तविक क्रिकेट ला किती महत्व द्यावे हे ठरविण्याची आज वेळ आली आहे. क्रिकेट पेक्षा आपल्या शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करणार्या युवकाला आणि देशाच्या भावी आधार स्तंभाला पूर्ण आणि सविस्तर मार्गदर्शनाची गरज असून आजचे गब्बर शिक्षण सम्राट हे जबर फी आकारून या तरुणांना पद्धतशीरपणे फसवणूक करतात आणि बिचारे पालक इकडून तिकडून मोठ्या कष्टाने जमविलेले सर्व पैसे या निगरगट्ट झालेल्या  संस्था चालकांच्या घशात घालून मोकळे होतात. पण सर्व सविस्तर माहिती घेवून जर प्रवेश घेण्याचे ठरविले तर नक्कीच या सर्व गैर्प्रकाराना आळा  बसू शकतो. त्यासाठी सर्व पालक आणि विद्यार्थी या दोघांनीही घाई न करता शांतपणे सर्व माहिती घेवूनच पुढचे पाउल उचलावे आणि होणारी फसवणूक टाळावी .
                                                        महादेव विश्वनाथ कापुसकरी