Powered By Blogger

28 April, 2012

बालपण वाचवा ...( Save Childhood )














सध्या लेक वाचवा अभियान सर्वत्र राबविले जात आहें मात्र बालपण वाचविणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहें .
भारतात बालकामगार कायदा केवळ कागदावरच आहें प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अजिबात कुठे दिसत नाही.
आपण आपल्या दैनंदिन जीवनात जिथे जिथे जातो तेथे सभोवताल सहज दृष्टीक्षेप टाकला तर आपल्याला असे दिसेल की प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बालकामगार अत्यंत तोकड्या मजुरीच्या मोबदल्यात निर्घ्णपणे राबविले जात असलेले दिसतील .
काय चूक आहें या बिचार्या चिमुकल्यां बालकांची ? त्यांचे हसण्या,बागडण्याचे,खेळण्याचे वय असताना त्याना क्रूरपणे कामावर जुंपले जात आहें .संपूर्ण भारतात या बालकामगारांची संख्या किती आहें याचा शोध घेण्याचे काम हाती घेवून जर प्रामाणिकपणे सर्वे केला तर निश्चितपणे सर्वाना आश्चर्य करण्याची वेळ येईल अशी आकडेवारी समोर येवू शकते.अनेक वर्षांपूर्वी केलेल्या बालकामगार कायद्यात संशोधन करून बालकाना कामावर ठेवणार्या संस्थाना तसेच या बालकांच्या पालकाना सुद्धा दंडित करण्याची तरतूद होणे आवश्यक आहें.
या निरागस बालकाना जेव्हा श्रीमंत कुटुंबातील त्यांच्या वयाची मुले शाळेत जाताना,खेळत असताना,किंवा बागडत असताना पाहून काय वाटत असेल हि कल्पना करवत नाही.
IPL क्रिकेट च्या संयोजकांना या खेळातून करोडो नव्हे तर अब्जो रुपये मिळतात कारण त्याशिवाय एकेका खेळाडू साठी हे लोक बोली लावून करोडो रुपयांना त्याना विकत घेतात आणि तेथे नाचणार्या चीअर गर्ल्स ना सुद्धा लाखो रुपये दिले जातात .
यापेक्षा बालकामगारांकडे लक्ष केंद्रित करून त्या बिचार्या चिमुकल्यांचे हरवलेले बालपण त्याना बहाल करण्यासाठी काही मदत केली तर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य परत आलेले पाहण्यातील आपल्याला मिळणारा आनंद क्रिकेटचा सामना पाहून मिळणार्या आनंदापेक्षा नक्कीच श्रेष्ठ असेल.नाही का ?
पहा हि छायाचित्रे आणि आपल्या काळजाचा ठोका कुठे चुकतो का ते तपासा !
                                                                         महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                                                                          बसमतनगर  जी.हिंगोली.
                                                                          मो. 9423141008
                                                                          blog -www.mvkapuskari.blogspot.com

27 April, 2012

राहुल गांधींचा सातारा दौरा

राहुल गांधी यांच्या सातार्याच्या दौर्यामुळे तेथील दुष्काळ एकदम नाहीसा होईल का असा प्रश्न करणेच चुकीचे आहें असे वाटते.कारण प्रत्येकाला हे माहित आहें की अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने भेट दिल्याने तेथील दुष्काळी परिस्थिती बदलू शकत नाही. पण अशी एक व्यक्ती अशा ठिकाणी भेटीला येत आहें हि गोष्ट सुद्धा त्या व्यक्तीचे असामान्यत्व सिद्ध करून जाते.
दुष्काळी भागात स्वत: जावून तेथील पिडीत लोकांच्या वेदना जाणून घेण्याची जाणीव होणे हा संवेदनशीलतेचा भाग आहें जो की प्रत्येक नेत्यामद्धे आढळत नाही.मी व्यक्तिश: राहुल गांधी यांचा आदर करतो कारण काहीतरी वेगळेपण या तरुणात आहें.
मुंबई ला येवून लोकल ने प्रवास करणे,उपनगरातील स्टेशन समोरील ATM मधून पैसे काढणे,मजुरांसोबत काम करणे,एखाद्या गरीब नागरिकाच्या झोपडीत जाऊन रात्रभर खाटेवर झोपून मुक्काम करणे,इत्यादी गोष्टी करणे म्हणजे केवळ स्टंट करण्यासाठी आहेत हे मी मानत नाही .यासाठी एक प्रकारची जिगर लागते आणि ती जिगर गांधी घराण्यातील या तरुनामद्धे निश्चितपणे पुरेपूर आहें .
सातारा येथील दुष्काळ पिडीत लोकांच्या भावना जाणून घेवून त्यांच्यासाठी काय करता येईल अशा भावनेनेच हि भेट असावी .
                                                                         महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                                                                         बसमतनगर जी.हिंगोली
                                                                         मो. 9423141008  

26 April, 2012

सचिन तेंडूलकर ( खासदार )

सचिन चे हार्दिक अभिनंदन !
सचिन सारख्या निस्प्रह,कर्तबगार आणि प्रामाणिक तसेच त्याच्याकडे सोपविलेले काम पूर्ण क्षमतेने करणारया आणि विशेष म्हणजे सर्वांचा लाडका असलेल्या व्यक्तीकडे समाजाची सेवा करण्याची संधी देणार्या पंतप्रधानांच्या कार्यालयास मनापासून सलाम !
इतर कोणी तरी लोक किंवा विनोद कांबळी या त्याच्या मित्रांकडून असे मेसेज येत आहेत की त्याने राजकारणात जाऊ नये पण त्याने का जाऊ नये ?
आज देशाला सचिन सारख्या सच्च्या दिलाने काम करणार्या नेत्यांची खरी गरज आहें .
मला खात्री आहें की भारत रत्न हि पदवी देण्यापेक्षा एक खासदार म्हणून काम करण्याची संधी देणे हे केव्हाही श्रेष्ठ आहें .
सचिनला सुचना देणार्यांच्या यादीत अनेक लोक त्याच्या जवळचे असू शकतात परंतु त्याने कोणाचेही न ऐकता हि चालून आलेली संधी सोडू नये आणि या संधीचे सोने कसे करता येईल याचा सर्वांगाने विचार करावा असे वाटते.

10 April, 2012

जात प्रमाणपत्राची पडताळणी

जातीचे प्रमाणपत्र आपल्याला उपजिल्हाधिकारी कार्यालयातून दिले जाते.आणि हे देत असताना तहसीलकार्यालयामार्फत आपली सर्व कागदपत्रे तपासून पाहिली जातात आणि त्याची छाननी करून व सर्व सत्यतापडताळून पाहिली जावून आपली फाईल एकेक टेबल पुढे सरकत जाते.आणि शेवटी सर्व सोपस्कार पूर्ण करूनआपल्याला जातीचे प्रमाणपत्र दिले जाते.
आपल्याला हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही आपली फरपट संपत नाही.जेव्हा केव्हा निवडणुका येतात तेव्हा याप्रमाणपत्राची वैधता ( VALIDITY ) करून घ्यावी लागते.हे कशामुळे?
ज्या यंत्रणेद्वारे जातीचे प्रमाणपत्र दिले गेले ती यंत्रणा म्हणजे शासन.मग या शासनाच्या अधिकृत क्लास वन आणिसुपर क्लास वन अधिकार्यांनी एकेक कागदपत्रे अक्षरश:चाळणीतून तपासूनच हे प्रमाणपत्र दिले ना.... मग हियंत्रणा विश्वासार्ह नव्हे काय? जर विश्वासार्ह आहे तर मग VALIDITY कशासाठी?
जर का एखादी फाईल VALIDITY न होता लातूर येथून जर परत आली तर हे प्रमाणपत्र देणारा अधिकारी दोषीआहे असे समजावे काय?
VALIDITY चे एक टेबल जर उपजिल्हाधिकारी कार्यालयातच वाढविले तर जमणार नाही काय? काय तो येथेचफैसला होवून सामान्याची ससेहोलपट तरी होणार नाही.कारण जातीचे प्रमाणपत्र मिळविताना किती कष्ट लागतातहे प्रमाणपत्र काढ्लेल्यालाच माहित...
प्रशासनाने या बाबत जरूर सकारात्मक विचार केल्यास जनतेला नक्कीच दिलासा मिळू शकेल.
महादेव विश्वनाथ कापुसकरी